कारखान्यात कसे तयार होतात काजूगर… खालील लिंक क्लीक करून बघा…
भारतात काजूबियांवर प्रक्रिया करणारे छोटेमोठे कारखाने आहेत. सध्या त्यांची संख्या 1500 च्या आसपास आहे. भारतातील काजूच्या उत्पादन (सुमारे एक कोटी हजार मेट्रिक टन) आहे. बाजारपेठेच्या बाबतीत भारताचा अमेरिकेच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, केरळ, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू व पश्चिम बंगाल ही भारतातील प्रमुख काजू उत्पादक राज्ये आहेत. देशात काजूचे सर्वात जास्त उत्पन्न (अंदाजे १.७५ लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. राज्यात सुमारे १.६० हेक्टर क्षेत्रात काजू पीक घेतले जाते. महाराष्ट्र राज्यातील काजूला परदेशात मोठी मागणी असल्याने यातून देशाला परकीय चलन मिळते. गेल्या काही वर्षात भारतातील काजूचे लागवड क्षेत्र चारपट वाढले आहे. कच्च्या काजूबियांचे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन सुमारे ८४० किलोग्रॅम आहे व वार्षिक उत्पादन जवळपास चार लाख टन आहे. महारा्ष्ट्रात उपलब्ध असणार्या कच्च्या मालाच्या फक्त २५ टक्के एवढ्याच काजू-बीवर राज्यांतल्या हजारो काजू कारखान्यात प्रक्रिया होते. तर ७५ टक्के काजू बी इतर प्रांतांत विक्री करून तिथेच प्रोसेसिंग केले जाते.
काजू प्रक्रिया उद्योगाची थोडक्यात पद्धती अशी आहे…
झाडावरून पडलेले काजू शेतकरी गोळा करतात. शेतकऱ्यांकडून काजू बिया विकत घेतल्यावर, त्या स्वच्छ पाण्यात धुऊन चार/पाच दिवस उन्हात सुकवल्या जातात. नंतर बिया ९० ते १०० अंश सें. तापमानात ४५ मिनिटे बॉयलरमध्ये उकळून घेतल्या नंतर बिया तशाच 12/15 तास सावलीत वाळवतात, बिया पूर्णपणे वाळल्यावर काजू बी कटर मशीनद्वारे फोडतात. बियांची टरफले काढून, आतील काजूगर अंदाजे आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर काजूगरांच्या आकारानुसार वर्गीकरण करून हाताने पॉलिश केल्यानंतर त्यांचे पॅकिंग करतात.
काजूगराची प्रतवारी
काजूगराची प्रतवारी (ग्रेडिंग) काळजीपूर्वक केली जाते. मोठ्या आकाराचे अखंड चांगले काजू, मध्यम आकाराचे काजूगर, दुभंगलेले काजूगर, तुकडा काजूगर असतात. काजूगराचा आकार, रंग यावर काजूचा दर अवलंबून असतो.
आकर्षक पॅकिंग
काजू टिन फिलिग मशीन, टिन पॅकिंग मशीन, कॅश्यू साइझिंग मशीन अशा प्रकारच्या मशिनरीसुद्धा पॅकिंगसाठी उपलब्ध असतात. पाव किलो, अर्धा किलो व एक किलोचे पॅकिंग मध्ये काजूगर विक्रीसाठी ठेवले जातात….