दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही

मुंबई पुणे महामार्ग (Express Way) हा आपल्या भारत (India) देशामधील सर्वात पहिला द्रुतगती महामार्ग आहे. महाराष्ट्रातील दोन मोठया शहरांना जोडणारा ९४.५ किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग २००२ साली बांधून पूर्ण होऊन वाहतुकीस खुला करण्यात आला.
भारतातील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक म्हणून हि या द्रुतगती महामार्गाची ओळख आहे. . २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे नाव दिले गेले.
इतर वाहनांना प्रवेश नाही – दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नसल्याने कोणताही अडथळा जोडरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गावर प्रवाश्यांना आपल्या वाहनाने सुसाट वेगाने प्रवास करता येतो (कमाल वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रति तास). या एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे दरम्यानचा अंदाजे ५ तासांचा प्रवास अवघ्या २ तासांवर येऊन ठेपला आहे.
मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल तसेच एकूण ६ बोगदे आहेत.
टोलनाके – खालापूर व तळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके आहेत. सद्यस्थितीत कारना एकेरी फेरीसाठी २३० रुपये (या दरात सातत्याने वाढ होत असते) इतका टोल मोजावा लागतो. जर आपल्या गाडीला फास्ट टॅग नसेल किंवा त्यात बॅलन्स नसेल किंवा कमी असेल तर दुप्पट टोल म्हणजे ४६० रुपये रोख स्वरूपात भरून आपण मार्गक्रमण करू शकतो. पैसे वाचवायचे असल्यास या महामार्गावरून प्रवास करण्याआधी आपल्या फास्ट टॅग अकाउंट मध्ये योग्य बॅलन्स आहे का नाही याची खात्री करावी.
गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत – शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड / रावेत निगडी व चिंचवडसाठी.

