
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारण्यात येणाऱ्या करास पुढील तीन वर्षांसाठी सूट देण्याच्या निर्णय
मुंबई : फेरी बोट, रो-रो बोटी यांमधून प्रवास करणारे प्रवासी, पाळीव प्राणी, वाहने ,माल इत्यादींवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारण्यात येणाऱ्या करास पुढील तीन वर्षांसाठी सूट देण्याच्या निर्णयामुळे जलवाहतुक स्वस्त होऊन जलवाहतुकीला चालना मिळेल असा विश्वास बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.
राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत दि.१ जाने २०२२ पासून नव्याने जलवाहतुक सुरू झाली आहे.
या जलमार्गावरुन चालणाऱ्या फेरी बोट, रो-रो बोटी यांमधून प्रवास करणारे प्रवासी, पाळीव प्राणी, वाहने, माल इत्यादींवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारण्यात येणाऱ्या करास पुढील तीन वर्षांसाठी सूट देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन