नारळ पोफळीच्या गर्द हिरवाईत असलेल्या वाडीत कॉटेजेस मध्ये निवास / भोजनाची व्यवस्था
कोकणी सिफूड साठी प्रसिद्ध – Ambiance Cottage
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात समुद्र किनारी असलेल्या दिवेआगर येथील एंबिएन्स कॉटेज बद्दलची संपूर्ण माहिती महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत
दिवेआगर गावात सुवर्ण गणेश पाखाडीवर नारळी-पोफळीच्या निसर्गसंपन्न वातावरणात असलेले Ambiance Cottage म्हणजे पर्यटकांच्या आवडीचे निवास स्थान. शहरातल्या धकाधकीच्या जीवनापासून दूर असलेल्या नारळी-पोफळीच्या बागांमध्ये गुरफटलेल्या निसर्गरम्य वातावरणातील हे रिसॉर्ट. कोकणी संस्कृती आणि जीवनशैली जपणारे हे अंबिएन्स कॉटेज पर्यटकांसाठी एक प्रकारे स्वर्गसुखाचा अनुभव देणारे असेच आहे. या ठिकाणाहून पायी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर समुद्रकिनारा असल्याने पर्यटकांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच ठरते.
अत्याधुनिक सुविधांयुक्त निवास व्यवस्था
लालाभाई जोशी (विजय पटवर्धन) यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन 2004 साली एंबिएन्स कॉटेज पर्यटकांसाठी सुरू केले. मुंबई पुण्यापासून जवळ असल्याने विकेंड डेस्टिनेशन दिवेआगर प्रसिद्ध आहे. त्यामुळे शनिवार , रविवार आणि सुट्टीचे दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी येथे असते. अंबिएन्स कॉटेजमध्ये पर्यटकांना रहीवासाची अगदी उत्तम सोय पुरवण्यात येते. दोन प्रकारचे कॉटेज अर्थात अत्याधुनिक निवारा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंगल बंगलो कॉटेज आणि ट्वीन बंगलो कॉटेजेस मध्ये निवासाची सोय करण्यात येते. ज्यावेळी एखादा मोठा ग्रुप अथवा संपूर्ण फॅमिली येथे सफरीवर येते तेव्हा ट्वीन कॉटेज हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
Ambiance Cottage मध्ये एसी अथवा नॉन एसी रूम टेलिव्हिजनसह उपलब्ध असून २४ तास गरम आणि थंड पाण्याची सुविधाही पर्यटकासाठी पुरवण्यात येते. प्रत्येक कॉटेजच्या बाहेर टेबल खुर्च्या टाकून मस्त बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. आधुनिक सुविधांनी युक्त सर्व सोईसुविधा युक्त असे हे एंबिएन्स कॉटेज कोकणी वाडीत निवास आणि भोजन सुवीधा देत असल्याने पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून ही प्रसिद्ध आहे.
समुद्र किनारी निसर्गाच्या सानिध्यात कृषी पर्यटन
एंबिएन्स कॉटेजला एक प्रकारे इको फ्रेंडली ऍग्रो टुरिझम देखील म्हणता येईल. कारण या ठिकाणी शक्य तितक्या कृषी उत्पादनांचा वापर दैनंदिन उपयोगासाठी केला जातो. येथे असलेल्या गोबर गॅस प्लॅन्टमध्ये तयार होणाऱ्या गॅसवर पर्यटकांसाठी स्वयंपाक तयार केला जातो. त्यामुळे ऍग्रो टुरिझम अथवा इको फ्रेंडली टुरिझमचा उद्देश आपोआप साध्य होतो.
Ambiance Cottage Restorent & Dinning Hall
कोकणच्या नारळ पोफळी तसेच केळी, आंबा, फणस यांच्या गर्द वनराईत निसर्गरम्य अशा प्रदूषणमुक्त हवा असलेल्या वातावरणात रेस्टॉरंट आणि डायनिंग हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. नॉनव्हेज, सी फूड आणि शुद्ध आणि सात्विक घरगुती शाकाहारी जेवणाचा मनमुराद आस्वाद पर्यटकांना याठिकाणी घेता येतो. व्हेज आणि नॉनव्हेज साठी स्वतंत्र स्वयंपाक गृहाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या भावनांचाही विचार याठिकाणी केला जातो.
कोकणातील पारंपरिक मसाले/पदार्थांना प्राधान्य
सकाळच्या नाश्त्यामध्ये स्थानिक पद्धतीचा पारंपरिक कोकणी नाष्टा, आंबोळी, पानग्या आणि घरच्या गाईच्या दुधापासून तयार केलेला चहा/कॉफी, कोकम सरबत, सोलकढी येथे उपलब्ध असते.
सीझनमध्ये आमरस पुरीवर पर्यटक ताव मारतात. वाडीत गाय व्याल्यानंतर तिच्या घट्ट दुधा पासून तयार करण्यात आलेली खरवस देखील पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येतो. येथील बिरड्याची अथवा डाळींब्याची उसळ पर्यटक मोठ्या आवडीने खातात. सर्व पदार्थ हे स्थानिक मसाल्यांमध्ये बनवले जात असल्यामुळे त्यांना कोकणी धाटणीची चव असते आणि हेच आपले वैशिष्ट्य एंबिएन्स कॉटेजने जपून ठेवले आहे.
उकडीचे मोदक : स्वीट डिश मध्ये घरच्या नारळाच्या खोबऱ्याचे सारण असलेले उकडीचे मोदक म्हणजे इथली खासियत. प्रमाणबद्ध आकार आणि चव पर्यटकांना तृप्त करून जाते.
नॉनव्हेज अथवा सी फूड मध्ये रुची असलेल्या पर्यटकांसाठी स्वतंत्र स्वयंपाक गृहाची सुविधा आहे. या ठिकाणी सी फूड मध्ये पापलेट, सुरमई, प्रॉन्स ई. माशांचा नागरिक आवडीने आस्वाद घेतात. हे प्रकार नवीन मासे खाणाऱ्यांसाठी देखील अगदी उत्तम पर्याय ठरतात. Ambiance Cottage येथे गेल्याशिवाय या सर्व गोष्टींचा आनंद मात्र आपल्याला घेता येणार नाही हे मात्र खरं.
दिवेआगर येथे येण्यासाठी सर्वोत्तम काळ
थंडीचा काळ हा कोकण मधील पर्यटनासाठी उत्तम असा मानला जातो. कारण या काळात आद्रता कमी असल्यामुळे पर्यटक आनंदाने कोकण एंजॉय करू शकतात. मार्च नंतर वाढणाऱ्या आर्द्रतेमुळे घाम येण्याचे प्रमाण वाढत असते. नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या आधी कोकण सफर पर्यटकांसाठी उत्तम मानली जाते. या काळात समुद्र देखील शांत असल्याने अचानक होणारे वातावरणातील बदल या काळात होत नाहीत त्यामुळे ही वेळ अगदी योग्य मानले जाते.
दिवेआगरच्या मध्यर्ती ठिकाणी हे एंबिएन्स कॉटेज असल्याने स्थानिक आणि दिवेआगरच्या इतर भागांतील ग्राहकांना ही सेवा देणारे वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून प्रसिध्द आहे.
प्रमुख शहरापासून अंतर
मुंबई : १८५ किमी
पुणे : १८० किमी
माणगाव – ४५ किमी
पनवेल : १२५ किमी
हरिहरेश्वर : २५ किमी
कोकण रेल्वेने आल्यास माणगाव रेल्वे स्टेशनवर उतरून दिवेआगर येथे येता येते. मुंबई आणि पुण्याहून दिवेआगरला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.