Tuesday, May 20, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

२२६२ किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा निघाला काश्मिरकडे

पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध विकास कामे प्रगतीपथावर

जिल्ह्यातील अमृत कलशांचे वाजत-गाजत मिरवणुक

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 23, 2023
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकत्रित केलेला जिल्ह्यातील एक कलश २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे रवाना होणार

जळगाव l जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, नगरपंचायती यांनी जमा केलेले ‘अमृत कलश’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाजत-गाजत मिरवणूक काढत जमा करण्यात आले. हे सर्व अमृत कलश एकत्र करून जिल्ह्यातील एक कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई व दिल्ली येथे पाठविले जाणार आहेत.

जिल्ह्यातून एकत्रित केलेले ‘अमृत कलश’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या अमृत कलक्षांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त डॉ विद्या गायकवाड, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार यांनी स्वागत केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या टॅगलाइनसह ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र अमृत कलश यात्रा काढण्यात आल्या. ज्या कुटुंबांकडे शेती आहे अशा कुटुंबांतील सदस्यांकडून माती व ज्या कुटुंबांकडे शेती नाही अशा कुटुंबातील सदस्यांकडून एक चिमूटभर तांदूळ मातीच्या कलशात जमा करण्यात आले. तसेच सर्व नगरपरिषद यांनी शिलाफलकम समर्पण – वीरांच्या नामफलकाची स्थापना, पंचप्राण प्रतिज्ञा घेणे, वसुधा वंदन देशी झाडांच्या ७५ रोपांसह अमृत वाटिकेची निर्मिती, वीरों का वंदन – देशाचे आणि शूरांच्या कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक / वीरांचा सन्मान राष्ट्रध्वज फडकवणे आणि राष्ट्रगीत गायन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय एक कलश व जळगाव महानगरपालिकेचा एक कलश बनविण्यात आला. बनविण्यात आलेला अमृत कलश मुंबई व दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत अमृत कलश मुंबई येथे २६ ऑक्टोंबर रोजी रवाना होतील

तद्नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आझाद मैदान मुंबई येथे २७ ऑक्टोंबर रोजी कार्यक्रम संपन्न होईल. तदनंतर सर्व स्वयंसेवक कलश घेऊन २७ ऑक्टोंबर रोजी विशेष रेल्वेने दिल्ली येथे रवाना होतील. राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिट्टी को नमन, वीरों का वंदन हा सोहळा संपन्न होऊन देशभरातून जमा करण्यात आलेल्या मातीतून राजधानी दिल्ली येथे अमृत वाटिका व वॉर मेमोरिअल तयार करण्यात येणार आहे.

Tags: agro tourismIndia TourismMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास
Maha Tourism News

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

May 20, 2025
पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल
Maha Tourism News

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

May 19, 2025
आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 18, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In