Tuesday, May 20, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जालना जिल्ह्यात रेशीम शेती क्रांती घडवुन आणेल

प्रधानमंत्री यांच्या हस्ते देशभरात ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

जेजुरी गड येथे पर्यटक आणि भाविकांसाठी सोयी सुविधा, सुशोभीकरण करण्यात येणार

जालना जिल्ह्यात रेशीम शेती क्रांती घडवुन आणेल

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 7, 2023
405 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोष विक्रीपासुन चांगले उत्पादन घेतल्याबद्दल सोमेश्वर वैद्य यांचा विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांच्या हस्ते ‘ऑरेंज कॅप’ घालुन सन्मान

जालना l विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथे रेशीम शेतीची नुकतीच पाहणी केली. कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे जालना जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकरी वळले आहेत. रेशीम शेती जालना जिल्हयातील शेती पध्दतीमध्ये निश्चितपणे क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन श्री. अर्दड यांनी यावेळी केले. जालना जिल्हयास रेशीम कपडा निर्मिती करण्यासही चांगली संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते.निपाणी पिंपळगाव येथील युवा शेतकरी सोमेश्वर डिगांबर वैद्य आणि नामदेव भीमराव माने यांच्या रेशीम शेतीची विभागीय आयुक्तांनी पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. यावेळी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम उद्योग योजना व फायदे याविषयी माहिती दिली.सोमेश्वर वैद्य यांनी जून 2022 मध्ये 2.00 एकर क्षेत्रात तुती लागवड केली आहे. आक्टोबर -2022 पासुन त्यांनी रेशीम अळयांचे संगोपन करून कोष ‍ निर्मिती सुरू केली. आक्टोबर-2022 ते जुलै-2023 या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये सोमेश्वर यांनी रेशीम किटक संगोपनाच्या एकुण 8 बॅच घेतल्या व कोष विक्री पासुन 6,56,358/- इतके उत्पन्न मिळविले. तसेच मनरेगाचे माध्यमातुन त्यांना अकुशलचे रू.2,14,000/- अनुदान अदा करण्यात आले. एकंदरीत सोमेश्वर वैद्य यांनी नऊ महिन्यांच्या कालावधी मध्ये रेशीम कोष व अनुदान मिळुन रू.8,70,358/- चे उत्पन्न मिळविले आहे. म्हणजे त्यांना प्रति महा रू.96,706/- उत्पन्न मिळाले आहे.

यावेळी तुती रेशीम कोष विक्रीपासुन चांगले उत्पादन घेतल्याबद्दल सोमेश्वर वैद्य यांचा विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांच्या हस्ते ‘ऑरेंज कॅप’ घालुन सन्मान करण्यात आला. तर त्यांच्या पत्नी सविता सोमेश्वर वैद्य यांचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांच्या हस्ते ‘ऑरेंज कॅप’ घालुन सन्मान करण्यात आला.

श्री. अर्दड यांनी रेशीम उत्पादक शेतकरी नामदेव भीमराव माने यांच्या रेशीम किटक संगोपन केंद्राचीही पाहणी करून माहिती घेतली. नामदेव माने यांनी सुरूवातीस 1.00 एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली होती; परंतु रेशीम शेतीमधील भरघोस व शाश्वत उत्पन्न पाहुन त्यांनी आता 4.00 एकर क्षेत्रात तुती लागवडीचे क्षेत्र वाढविले. त्यांना प्रतिमहा रेशीम कोष विक्रीपासुन रू.60,000-90,000/- उत्पन्न माने मिळाते.

विभागीय आयुक्त म्हणाले की, कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे जालना जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकरी वळले आहेत. रेशीम शेतीत शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातच रोजगार मिळण्याबरोबरच चांगले उत्पादनही मिळत आहे, हे शेतकरी सोमेश्वर वैद्य यांच्या रेशीम शेतीमधील उत्पादन पाहता दिसून येते. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन तुती लागवड, कोष उत्पादन, किटक संगोपन गृह उभारणी इत्यादीकरीता प्रति एकर रूपये 3,58,515/- अनुदानही देण्यात येते, त्यामुळे रेशीम शेती जालना जिल्हयातील शेती पध्दतीमध्ये क्रांती घडवुन आणेल.‍

जिल्हाधिकारी म्हणाले की, रेशीम अंडीपुज निर्मितीपासून ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रीया उपलब्ध असणारा जालना हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे, जालन्याच्या रेशीम कोष बाजारपेठेत राज्यातील सर्व जिल्हयांतुन शेतकरी रेशीम कोष विक्री करता येत असतात, त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन जालना जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उद्योगास सुरूवात करावी व आर्थिक समृध्दी प्राप्त करून घ्यावी, यासाठी प्रशासन सर्वतोपरी शेतकऱ्यांना सहकार्य करेल.

पाहणीदरम्यान निपाणी पिंपळगावचे सरपंच प्रतिभा प्रदिप बिरनावळे, रवना गावचे सरपंच संभाजी देशमुख, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय कृषि अधिकारी सखाराम पवळ, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ग्रामसेवक ज्ञानेश्वर सोनवणे, वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक रेशीम एस.आर.जगताप, कंत्राटी तांत्रिक अधिकारी मनरेगा अनिरूध्द धांडे आदी उपस्थित होते.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismReshim farmingSilk farmingरेशीम उद्योग
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास
Maha Tourism News

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

May 20, 2025
पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल
Maha Tourism News

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

May 19, 2025
आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 18, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In