Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
विकासामध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्टे महत्त्वाची… उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावरावरील उपाययोजनांचा प्रस्ताव तात्काळ सादर करा..... पालकमंत्री सतेज पाटील

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते

विकासामध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्टे महत्त्वाची… उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 19, 2021
406 4
0
564
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्यवसाय सेमिनार आणि व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

Gandhi Teerth – Jain Hills

पुणे : विकास कामांमध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्टे महत्त्वाची आहेत. त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे  प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. पुणे येथे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्यवसाय सेमिनार आणि व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  मोरक्को, नायजेरिया, कोस्टारिका व अझरबैजान या राष्ट्रांचे राजदूत हजर होते. यावेळी अनेक उद्योजकांचा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.

अझरबैजान, कोस्टारिका, मोरोक्को, मलावी आणि नायजेरियाच्या राजदूतांनी त्यांच्या राष्ट्रामध्ये होत असलेल्या औद्योगिक प्रगतीबरोबर विविध कामासंदर्भात सर्व भारतीय उद्योजकांसमोर सादरीकरण केले. तसेच भारतीय उद्योजकांना त्यांचे राष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आवाहन केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कोरोनानंतर जग खूप वेगाने जवळ येत आहे.अनेक बदल घडत आहेत. अशा वेळी हे ‘ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्ड’ देण्यात येत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. उद्योग वाढीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

वातावरण बदल व शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून विकास झाला पाहिजे. सर्वानी आपला विकास हा वातावरणाच्या बदलाची दिशा ओळखून केला पाहिजे. 2030 पर्यंत कार्बन मुक्त जग निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी यावेळी सर्व राजदूतांना विधानभवनात येणेबाबत निमंत्रित केले. तसेच पुणेरी पगडी घालून चारही राजदूतांचा सत्कार करताना त्यांनी पगडी ही वैचारिक प्रगल्भतेचे प्रतीक असल्याचे सांगितले.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismNilam gorheratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In