श्रावण कृष्ण त्रयोदशी या दिवशी भगवान श्री परशुराम यांनी कोंकणभूमीची निर्मिती केली.
जी भूमी आपल्याला अन्न, वस्त्र व निवारा देते त्या भूमीला श्रावण कृ. त्रयोदशी या दिवशी सायंकाळी वंदन करा अशी आज्ञा भगवान श्री परशुराम यांनी संपूर्ण कोकणवासीयांना दिली आहे.
कोकण भूमीची निर्मिती श्रावण कृष्ण त्रयोदशी या दिवशी भगवान श्री परशुराम यांनी कोंकण भूमीच्या निर्मितीचे कार्य पूर्ण केले. याप्रसंगी त्यांनी श्रीरामेश्वरांची स्थापना केली आणि रामतीर्थ तलाव निर्माण केला. याचा संदर्भ व्याडेश्र्वर माहात्म्य या ग्रंथात सापडतो.
यावर्षी श्रावण कृ. त्रयोदशी गुरुवार दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ठिक ५.३० ते ६.०० या कालावधीत सालाबादप्रमाणे भगवान श्री परशुराम मंदिरात कोकण भुमीचे पूजन केले जाणार आहे. आपण सर्व भाविक या पूजनामध्ये प्रत्यक्ष मंदिरात येऊन सहभागी होऊ शकता.
तसेच सर्वांना आपापल्या घरात देखील कोकण भूमीचे पूजन करता येईल. आपल्या घराच्या अंगणातील, बागेतील जमिनीला वंदन करावे, हळदकुंकू अर्पण करावे, उदबत्ती, निरांजन दाखवावे व दूध साखरेचा किंवा नुसता साखरेचा आपल्या इच्छेनुसार नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करावी.
आपण आपल्या घरी केलेल्या पूजनाचे फोटो पाठविल्यास या श्री परशुराम देवस्थानाच्या माध्यम समूहावर ते प्रसिद्ध करण्यात येतील.
फोटो कृपया खालील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत. श्री. जयदीप जोशी – 9028980125, श्री. शंकर कानडे – 7774021100
|| जयतू कोकण भूमी ||।। राजराजेश्र्वर भगवान श्री परशुराम महाराज की जय।।
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (6)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,125)
- Mahaparyatan Business (4)
- Uncategorized (9)
- ऐतिहासिक ठिकाणे (15)
- कथाकथन / प्रवासवर्णन (1)
- कृषी पर्यटन (16)
- कृषी माहिती आणि उत्पादने (90)
- खाद्य भ्रमंती (6)
- गड, सागरी किल्ले (10)
- धबधबे (5)
- परंपरा / सण / उत्सव (19)
- प्राचीन देवस्थाने (45)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (29)
- समुद्रकिनारे (12)
- साहसी पर्यटन (6)