कासवांचा प्रवासमार्ग समजून घेण्यासाठी सॅटेलाईट टॅगिंग
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण 5 कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे नुकतेच आणखी दोन ऑलिव्ह रिडले सागरी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले. रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत.
नुकतेच ‘वनश्री’ नावाचे कासव गुहागर समुद्रकिनारी सोडण्यात आले. यापूर्वी ‘प्रथमा’ आणि ‘सावनी या कासवांना वेळास आणि रत्नागिरी येथून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविण्यात आले होते.
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांतर्गत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण 5 कासवांना अशा प्रकारे सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.
भारतातील पष्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर प्रयोग यषस्वी झाला असून , आता ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरांचा अभ्यास होण्यास मदत होणार आहे .
मँग्रोव्ह फाऊंडेशन व भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास व आंजर्ले या दोन ठिकाणी त्यानंतर गुहागर येथे हा उपक्रंम यशस्वी होत आहे .
रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले, वेळास इत्यादी ठिकाणी गेल्या 10 वर्षांपासून कासवमित्र काम करत आहेत. ऑलिव्ह रिडले जातीची मादी इथल्या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येते. ही बाब लक्षात आल्यानंतर मागील 10 वर्षांपासून इथे कासव संवर्धन अविरतपणे सुरू आहे.
वेळास इथला कासव महोत्सव जगप्रसिद्ध आहे. कासवाची समुद्राकडे धाव घेणारी लाखो पिल्ले बघण्यासाठी इथे पर्यटक कासव पेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यासाठीच इथे या काळात मुद्दाम कासव महोत्सवाच आयोजन केल जात.
मादी कासवाची ही अंडी अनेकदा चोरी केली जायची. म्हणूनच किनाऱ्यावरील प्रत्येक गावांमधील किमान 2, 2 लोकांना रोजगार देऊन या अंड्यांचं संरक्षण करण्यास इथे सुरुवात झाली. या सर्व मोहिमेत वन विभागाची भूमिका आणि सहकार्य मोलाचे आहे.
नुकतच इथे कासवांचा प्रवासमार्ग समजून घेण्यासाठी सॅटेलाईट टॅगिंग केलं गेलं. कासव संवर्धन आणि संरक्षणाच्या मोहिमेत ही खूप महत्वाची घटना मानली जात आहे